February 24, 2016
0
"आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे, 
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा... 

कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं, जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होत.

"आयुष्य छान आहे"..."थोडे लहान आहे "...परंतु लढण्यात शान आहे...!!

"चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., "चांगले दिवस आले की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत"

"सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं...


अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.

अनुभवाने एक गोष्ट शिकवली.. कोणाच्या चुकांना जगासमोर नको आणू, "देव" बसला आहे वर, तू हिशोब नको करु...

आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.

आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले, तरी दुसर्‍याला इजा करु नका.

आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे..

आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणारअसावं...

0 comments:

Post a Comment